शालेय पुस्तकांना कोरी पाने जोडणे निरुपयोगी, शिक्षण क्षेत्रातील सूर : थेट वह्याच मोफत किंवा अल्पदरात देण्याची मागणी

पुणे – पाठय़पुस्तकातच वह्यांची कोरी पाने जोडण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय निरुपयोगी असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दप्तराचे ओझे कमी होणार नाही, विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकाचा सलग अनुभव मिळणार नाही.

त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना थेट वह्याच मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, गरीब विद्यार्थ्यांना वह्या खरेदी करण्यात आर्थिक अडचणी येत असल्याचे नमूद करून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडण्याची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर पाठय़पुस्तकांत कोरी पाने जोडण्याच्या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनवंती हर्डीकर म्हणाल्या की, ”पहिली ते दहावीच्या पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडणे योग्य नाही. विशेषत: पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग नाही. कोरी पाने जोडल्याने पाठय़पुस्तकाला पुस्तक हे स्वरूपच राहात नाही. छापील पुस्तके सलगपणे वाचण्यात काहीएक अर्थ असतो. संपूर्ण वर्षांत मुलांचा विकास लक्षात घेऊन पुस्तकाची रचना केलेली असते. पण, आता ती पुस्तके तुकडय़ातुकडय़ांत दिल्याने मुलांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. नवी पाठय़पुस्तक रचना हा परीक्षा केंद्रित विचार आहे. दप्तराचे वजन पाठय़पुस्तकांमुळे नाही, तर खासगी पुस्तके, मार्गदर्शक पुस्तकांमुळे वाढते. त्यामुळे या पुस्तकांना आळा घालणे आवश्यक आहे.”

”पाठय़पुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येऊनही शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. पाठय़पुस्तकांत कोरी पाने जोडण्यामागे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्याचे कारण दिले जात असले, तरी गृहपाठ, वर्गकार्य आणि नोंदीसाठी स्वतंत्र वह्या ठेवण्याची सूचना आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्याचा उद्देश सफल होणार नाही. कागदाची दरवाढ आणि दरवर्षी नवी पुस्तके घेण्याच्या आवश्यकतेमुळे पालकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. नवी पुस्तके शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना, प्रचलित पुस्तके खासगी, विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना देणे हा भेदभाव आहे. त्यामुळे पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे,” असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

वजन वाढणार आहे. तसेच चार भाग केल्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच्या पुस्तकातील संदर्भ शोधणे त्रासदायक होईल. विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींची काळजी असल्यास शासनाने विद्यार्थ्यांना थेट वह्याच मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्याव्यात, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊ गावंडे यांनी व्यक्त केले.

पुनर्वापर अशक्य

प्रचलित पाठय़पुस्तकांचा पुनर्वापर केला जातो. वापरलेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडल्यावर त्या पानांवर विद्यार्थ्यांकडून लेखन केले जाणार असल्याने या पुस्तकांचा पुनर्वापर करता येणार नाही. त्यामुळे पुस्तकांची हजारो टन रद्दी निर्माण होईल. नवी पुस्तके दरवर्षी छापण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कागदवापरावा लागणार असल्याने पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होईल, असेही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील