आपबिती..मी ४० वर्षांपासुन फटाके उडविलेले नाहित,फटाक्यांमुळे शरिरावर होतात अनिष्ट परिणाम..सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

चोपडा (प्रतिनिधी):- सध्या दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. दिवाळीच्या वेळेस व इतर विशेष कार्यक्रमात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होत असते. खास करून दिवाळीत रात्री अपरात्री फटाक्यांचे मोठमोठे आवाज होतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण तर होतेच पण रात्रीची झोपही होत नसते. ध्वनीप्रदूषणाचे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने फटाक्यांमुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होताना दिसत आहेत. “फटाके वाजवू नका असे सांगितले जाते, पण फटाके विकू नका किंवा फटाके फोडु नका” असे कुणी सांगत नाही. दिवाळी सणांत फटाके उडवल्याने भारतात दरवर्षी पाच हजारांपेक्षाही जास्त व्यक्ती अंध होतात. त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त व्यक्ती बालक व तरुण असतात. जगात दरवर्षी फटाके व शोभेच्या दारूमुळे पाच लाखांपेक्षाही जास्त लोक अंध होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. म्हणुनच “मी साधारणत: १३..१४ वर्षांचा असेल तेव्हा दिवाळीत फुलबाजीने कोठी लावतांना त्याचा स्फोट झाला होता. मी लांब होतो म्हणुन त्या स्फोटातुन थोडक्यात बचावलो होतो.माझ्या उजव्या हाताची पाचही बोटे पुर्ण भाजली होती. कुणालाच न सांगता मी थंड पाण्यात हात बुडवुन बसलो होतो.थोड्या वेळाने हात पुर्ण सुजून त्यावर मोठमोठे फोडही आलेले होते. स्थानिक डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केलेत.पण दुसऱ्या दिवशी मला चोपडा येथील जुना सरकारी दवाखान्यात भरती करावे लागले होते.पंधरा दिवस दवाखान्यात होतो.तरिही सहा महिन्यांपर्यंत हातावर जखमेचे व्रण दिसत होते. तेव्हापासुन आजतागायत सुमारे ४० वर्षे झाली असतील मी फटाके फोडलेले नाहित की उडविलेले नाहित,” अशी आपबिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी सांगीतली आहे.

हे विषारी फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना त्याचा जास्त त्रास होत असतो. त्याच्या स्फोटामुळे बारीक माती व दगड खडे डोळ्यात जाऊन इजा होते. या फटाक्यांमधील गंध व इतर रासायनिक घटक डोळ्यांसाठी घातक असतात. फटाक्यांमुळे बहिरेपणा, अंधपणा, अंग भाजणे, इजा होणे हे तर होतेच पण कारखाने व दुकानातील स्फोटांमुळे अनेकांचे मृत्यूही झालेले आहेत. फटाक्यातून निघणाऱ्या धुरामुळे डोळे, फुफ्फुसे, त्वचा खराब होते. काहींना त्याची ऍलर्जी असल्याने दमाही होतो. तसेच फटाक्यांमुळे ध्वनी जल जमीन वायू दूषित होऊन त्याचा जीवसृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. ज्या ठिकाणी फटाके फोडले जातात त्या ठिकाणचे तापमान ४०० ते ६०० पर्यंत वाढुन तेथील शांतीही भंग पावलेली असते. व पैशांचाही अपव्यव होत असतो. काही राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी आहे. परंतु ते जर शक्य नसेल तर अशा वेळेस ध्वनी वायु प्रदूषणाचे कायदे कडक करणे गरजेचे आहे, अशी स्पष्टोक्ती चोपडा मार्केट कमेटिचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बुद्रूक) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला