थोड थांबा पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे लागणार, जयंत पाटील

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीप झुगारून मतदान केले आहे. या सगळय़ाचा निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय घटनापीठ नेमणार आहे.
तीन-चार महिन्यांत या सगळय़ाचा निकाल लागेल. तेव्हा, थोडं थांबा. या निकालानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मत व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ नेमण्याची केलेली कृती अतिशय गंभीर आहे. विधीमंडळात जे काम झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्यामागचा संदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है, असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल.

राष्ट्रपतीपदासाठी जो उमेदवार योग्य वाटला त्याला त्यांनी पाठिंबा दिला

शिवसेनेने राष्ट्रपती निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या भूमिकेचे जयंत पाटील यांनी समर्थन केले. ते म्हणाले, नेहेमीच त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. यापूर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता.

jalgaonsandesh

jalgaonsandesh