१०० कोटीचा आकडा फक्त सांगण्यासाठी, वास्तवात १३९ पैकी केवळ २९ कोटी नागरिकांचं पूर्ण लसीकरण : काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १०० कोटी डोसचं लसीकरण दिल्यानिमित्ताने देशाला संबोधित करत हे मोठ लक्ष्य प्राप्त केल्याचं सांगितलं. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी मोदींवर यावरून सडकून टीका केलीय. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी एक कार्टून शेअर करत ट्वीट केलंय. यात त्यांनी १०० कोटीनंतरची आठवण असं म्हणत सामान्य नागरिक साथीचा रोग, गॅस सिलिंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढ याच्याखाली दबलेला असल्याचं कार्टून शेअर केलं. या कार्टूनमध्ये सामान्य नागरिक महागाईच्या बोजाखाली दबलेला असतानाही मोदी दगडावर झोपून विनाचिंता योगासनं करत असल्याचं दाखवलं आहे.

कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी ट्वीटची मालिकाच शेअर केलीय. यात त्यांनी म्हटलं, “100 कोटी (१ बिलियन) हा आकडा केवळ ऐकायला भारी वाटतो, मात्र यातील खरी मेख त्याच्या तपशिलात आहे. १३९ कोटी नागरिकांपैकी केवळ २९ कोटी नागरिकांनाच पूर्ण लसीकरण मिळालंय. म्हणजे केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालंय. मग भाजपाचे नेते नेमका कशाचा आनंद साजरा करत आहेत?”

“उत्सव करणं थांबवा आणि प्रत्येकाला लस मिळेल यावर लक्ष केंद्रित करा”

“अमेरिकेत ५६ टक्के, चीनमध्ये ७० टक्के आणि कॅनडात ७१ टक्के नागरिकांचं संपूर्ण लसीकरण झालंय, मात्र भारतात केवळ २१ टक्के नागरिकांचं संपूर्ण लसीकरण झालंय. मोदींनी उत्सव साजरा करण्याआधी कामगिरी सुधारायला हवी. भविष्यात बुस्टर डोसची देखील गरज पडणार आहे. पहिला आणि दुसरा डोस शिल्लक असताना हे शक्य होणार आहे का? त्यामुळे हा उत्सव साजरा करणं थांबवावं आणि प्रत्येकाला लस मिळेल यावर लक्ष केंद्रित करावं,” असं मत सिद्धरमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केलं.

“६२ कोटी नागरिकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही”

“भाजपाचे नेते केवळ २१ टक्के जनतेचं लसीकरण झाल्याचा आनंद साजरा करत आहे का? केवळ २९ कोटी नागरिकांना कोरोना विरोधी लसीचे दोन डेस मिळाले आहेत आणि ४२ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. ६२ कोटी नागरिकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. ३१ डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचं संपूर्ण लसीकरणाचं ध्ये गाठण्यासाठी आणखी १०६ कोटी लसीचे डोस लागणार आहेत. करण्यासाठी,” असंही सिद्धारमय्या यांनी नमूद केलं.

“अपयशाची जबाबदारी घेताना गायब, श्रेय घेण्यासाठी कायम पुढे”

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान कार्यालयाची एक खास कार्यपद्धती आहे. करोना काळात गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष झालं त्याची जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा मोदी सरकार गायब असतं. मात्र, जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते तेव्हा सरकार सर्वात पुढे असतं.”

भारताने जानेवारी २०२० मध्ये लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुरुवारी (२१ ऑक्टोबर २०२१) रोजी भारताने १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पार केलाय.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी