सांगली : महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेत केवळ तीन आठवडे झालेल्या नवविवाहित पत्नीकडून पतीचा खून करण्यात आला आहे. ह्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल लोखंडे आणि राधिका लोखंडे यांचा विवाह दिनांक २३ मे रोजी पार पडला होता. परंतु लग्नानंतर अवघ्या तीन आठवड्यांतच त्यांच्या नात्यात वाद विकोपाला गेला आणि भयंकर शेवट गाठला.
१० जूनच्या रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर अनिल लोखंडे मध्यरात्री झोपायला गेला. त्याचवेळी राधिकाच्या रागाचा पारा चढला आणि तिने कुऱ्हाडीने पतीच्या डोक्यावर जोरदार वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की अनिलचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर राधिकाने काही मिनिटांतच आपल्या चुलत भावाला फोन करून ह्या घटनेची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि राधिकाला अटक केली.
राधिका लोखंडेला बुधवारी अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक वाद हा ह्या खुनामागचा मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही अधिक तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही घटना नुकत्याच घडलेल्या मेघालयमधील इंदोरच्या व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हनीमूनवरील हत्येच्या घटनेची आठवण करून देते. राजा रघुवंशीचा खून त्याच्या पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला होता. ह्या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे.
सांगलीतील ह्या नव्या घटनेमुळे नवविवाहित दांपत्यातील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्यय आला आहे.