जळगाव – येथील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शुक्रवारी (ता. १२) शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लोटगाड्या, दुकानांचे जमिनीवर असलेले फलक जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली.
जी. एस. ग्राउंड, शाहूनगर परिसरातून पाच नाश्त्याच्या लोटगाड्या जप्त करण्यात आल्या.
प्रतापनगर स्वामी समर्थ केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यातील चहाच्या टपऱ्या हटविल्या, तर गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकानाचे ये-जा करण्याच्या पॅसेजमधील २० ते २५ जाहिरातीचे स्टॅन्ड जप्त करण्यात आली.
गोलाणी मार्केटमधील जप्त साहित्य श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ठेवले आहे. अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सतीश ठाकरे.