अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये फक्त एक पेपर लीक झालेला नाही. तर आतापर्यंत जेवढ्या परिक्षा झाल्या तेवढे पेपर लीक झाले आहेत. देशात सर्वांत महत्त्वाच्या परिक्षांचे देखील पेपर लीक झाले. परंतु, परिक्षांचे पेपर लीक कसे होत आहेत? तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा नाही आणि युवकांचं भविष्य उज्ज्वल करायचे नाही यासाठी मोदी सरकार पेपर लीक करतंय, असा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर केला. लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषावर केलेल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत विविध विषयांवर भाष्य केलं.

गेल्या दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात माफियांचा जन्म झाला आहे. यांनी भविष्यातील युवकांच्या आकांक्षाना विष दिले आहे. सरकार हे निराशाचे प्रतीक नाही तर आशेचे प्रतीक असले पाहिजे. जनता आता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही. पुढच्या महिन्यात होणाऱ्या परिक्षांचे पेपर लीक न होण्याची सरकार गॅरंटी देणार का? असा सवालही यावेळी अखिलेश यादव यांनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची दोन वेळा सत्ता आली. त्याच उत्तर प्रदेशसोबत किती भेदभाव करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये जे महामार्ग तयार होत आहेत, ते राज्याच्या तिजोरीतला पैसा वापरून तयार केले जातायत. दिल्लीमधून अद्याप एकही राष्ट्रीय महामार्ग देण्यात आलेला नाही. तसेच, अखिलेश यादव ईव्हीएमवर बोलताना म्हणाले की, माझा आजही व उद्याही ईव्हीएमवर विश्वास नाही. जरी मी 80 जागा जिंकलो, तरी ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही. मी ईव्हीएमने जिंकून ईव्हीएम हटविण्यासाठी प्रयत्न करणार. जोपर्यंत ईव्हीएमचा मुद्दा मार्गी लागत नाही. तोपर्यंत समाजवादी लोकं सरकारला जाब विचारत राहणार, असे अखिलेश यादव म्हणाले.

”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गावे दत्तक घेतली होती. देशाच्या पंतप्रधानांनी एखादे गाव दत्तक घेऊनही जर त्या गावाचा कायापालट होत नसेल तर पुढील दहा वर्षांत ही गावाची प्रगती होणार नाही. मोदी सरकारने फक्त गावांची जाहिरातबाजी केली. परंतु, गावे जशी होती तशीच आहेत. ज्यांना दत्तक घेतले जाते, त्यांना अनाथ करून सोडून देणे ही चांगली गोष्ट नाही, असाही आरोप अखिलेश यादव यांनी सरकारवर केला.

लोकसभेत अखिलेश यादव यांनी अग्निवीर योजनेवरही टीका केली. ”सरकारने तरुणांना नोकऱ्यांपासून दूर ठेवले आहे. युवकांकडून रोजगार हिसकावून घेण्याचे काम सरकार करत आहे. आरक्षणाचा एवढा खेळ कोणत्याही सरकारने केला नव्हता, जेवढा या सरकारने केला आहे. सरकारला नोकऱ्या द्यायच्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा खेळ केलाय. म्हणूनच लोकांना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला जात नाही, असे लोकसभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी