पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं असताना पाण्याचा स्तर वाढल्याने ते वाहून गेलं.

दरम्यान ते पाण्यात वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत कुटुंब पाण्याच्या मधोमध उभे असल्याचं दिसत आहे. पाण्याचा स्तर आणि वेग जास्त असल्याने अखेर त्यांचा तोल जातो आणि सर्वजण एकत्र वाहत जाताना ते दिसत आहेत.

नेमकं काय झालं?

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. यातील तिघांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरु आहे.

सीसीटीव्हीत नेमकं काय?

सीसीटीव्हीत कुटुंब पाण्याच्या मधोमध उभं असल्याचं दिसत आहे. यावेळी पाण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. दुसरीकडे कुटुंब एकमेकाला घट्ट पकडून पाण्यातून वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असतं. दुसरीकडे बाहेर असणाऱ्यांपैकी काहीजण त्यांच्याकडे दोरी टाकत मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही वेळाने संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून जातं. पुढे गेल्यानंतरही ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा टीकाव लागत नाही.

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरलं आहे. पावसाळ्यात प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असल्याने भुशी धरणवार लोक गर्दी करत असतात. पण अशावेळी नसतं धाडस करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातो. पाण्यात जाण्याचा आणि त्यात फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. अशाच प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालत आहोत याची अनेकांना जाणीव नसते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे.

माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवली

पुण्यातील माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे विकेंडला येणा-या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. जून महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊसच नसल्यानं धबधबे प्रवाहित झालेले नाहीत. याचा याठिकाणच्या व्यावसायिकांना फटका बसला आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं व्यावसायिक अडचणीत आले आहे.

पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज पुणे ,सातारा सह संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज आणि उद्या पुणे शहरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला