शेतकऱयांचे आंदोलन चिघळणार मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनाने शेतकऱयांना चिरडले

जळगाव संदेश न्युज नेटवर्क

उत्तर प्रदेशच्या लखिमपूर-खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या गावात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमापूर्वी मोठा गदारोळ झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी एकत्र आलेल्या शेतकऱयांची प्रथम पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली. यादरम्यान मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांनी काही आंदोलक शेतकरी चिरडल्याची घटना घडली. या घटनेत अनेक शेतकरी जखमी झाले. तर दोन शेतकऱयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती कळताच आंदोलक शेतकऱयांनी जाळपोळ सुरू केली आहे. अनेक वाहनांना त्यांनी पेटवून दिले आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी टेनी गावात उपमुख्यमंत्री मौर्य यांना भेटणार होते. यावेळी शेतकऱयांनी गावातील मैदानात निर्माण करण्यात आलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. टिकुनिया येथे शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी उभे राहिले. याचवेळी खासदार आणि गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने शेतकऱयांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता लखिमपूरमधील इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे. लखिमपूरमधील घटनेच्या विरोधात सोमवारी देशभरात निदर्शने करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियंका वड्रा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सोमवारी लखिमपूर खेरी येथे पोहोचणार आहेत. तर पंजाब आणि अंबालामध्ये शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांनी अनेक महामार्गांवरील वाहतूक रोखून धरली आहे. तर केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱयांच्या मारहाणीत 3 भाजप कार्यकर्ते तर एक चालक मारला गेल्याचा दावा केला आहे.

3 शेतकऱयांच्या मृत्यूचा दावा

या घटनेनंतर संतप्त शेतकऱयांनी तेथे उभ्या करण्यात आलेल्या अनेक वाहनांना पेटवून दिले आहे. तर तणाव पाहता मोठय़ा प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. लखनौमधून आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह देखील घटनास्थळासाठी रवाना झाले आहेत. या घटनेत 3 शेतकऱयांचा मृत्यू झाल्याचा दावा भारतीय किसान युनियनने केला आहे. पण जिल्हा प्रशासनाने अद्याप याची पुष्टी दिलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत गाझीपूर येथून लखिमपूर-खेरीसाठी रवाना झाले आहेत. या घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चाने सर्व जिल्हय़ांमधील शेतकऱयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. टिकैत लखिमपूर-खेरी येथे पोहोचताच शेतकरी संघटना पुढील रणनीती ठरविणार असल्याचे समजते. तरीही सद्यस्थितीत या घटनेचा तपास स्थानिक प्रशासनाकडून न करता सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

अखिलेश यादवांकडून टीका

याप्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केला आहे. कृषी कायद्यांना शांततेने विरोध करणाऱया शेतकऱयांना भाजप नेत्याच्या पुत्राकडून वाहनाने चिरडण्याचे कृत्य अमानवीय आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेश दांभिक भाजप नेत्यांचा अत्याचार आता सहन करणार नाही. हीच स्थिती राहिल्यास उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीतून जाऊ शकणार नाहीत आणि उतरूही शकणार नाहीत असे अखिलेश यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींकडूनही लक्ष्य

जो या अमानवीय नरसंहाराला पाहून देखील गप्प आहे, तो पूर्वीच निष्प्राण झाला आहे. पण आम्ही या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी