13 वर्षीय मुलाचं अपहरण! 5 कोटींची मागणी अन् फडणवीसांनी घेतली दखल, अखेर काय घडलं?

जालना – जालना येथून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात कृष्णा मूजमुले पाटील यांचा 13 वर्षीय मुलगा श्रीहरी कृष्णा मूजमुले याचं अपहरण झालं. शाळेत जाताना सकाळी 8 च्या सुमारास रस्त्यातून त्याचं अपहरण करण्यात आलं.

अपहरण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी 5 कोटीची खंडणी मागितली.

कोणतीही वेळ न गमावता मुलाच्या वडिलांनी सदर हकीकत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांना फोनवर कळवली. ओमप्रकाश शेटे यांनी सदर बाब राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीसदेखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांची पथकं तयार करण्यात आली. घटनेला 2 तास झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज खंगाळत पोलिसांना अपहरणकर्त्याचे आयडेंटीफिकेशन करण्यास यश मिळाले. अपहरण झाल्यानंतर 5 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू, अशी धमकी अपहरणकर्ते देऊ लागले.

 

छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलांने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, असं त्यांनी सांगितलं. पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचं ठरलं. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.

10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशांची व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना रात्री साडेआठ वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी येण्यास सांगितलं. पोलिसांनी रचलेल्या सापळ्याप्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले. त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्याआधीच पोलिसांनी झडप घातली. अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं