सौदी अरेबियात उष्णतेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर i भारतीयांचाही समावेश

जगभरातील देश सध्या भीषण उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशातच सौदी अरेबियाच्या कडाक्याच्या उन्हामुळे यंदाच्या हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुचीं मोठी अडचण झाली आहे.

सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत १००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील मक्का येथे आतापर्यंत १००० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मृतांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज करण्यासाठी मक्केला पोहोचतात. या वर्षी सुमारे १८ लाख लोक हज यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे इथली परिस्थिती बिकट बनली आहे. या आठवड्यात मक्कामधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

मक्का हा एक असा प्रदेश आहे जिथे उष्णतेचा कहर फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही दिसून येतो. या ठिकाणचे तापमान हिवाळ्यातही लोकांना अस्वस्थ करते. अशातच आता हज यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. माध्यमंच्या वृत्तानुसार, आतापर्यंत मक्काध्ये १० देशांतील १०८१ हाजींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वाधिक ६५८ लोक इजिप्तमधील होते. याशिवाय भारत, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल आणि ट्युनिशिया येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे.

मक्का येथे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये भारतीयांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मृतांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. यावेळी भारतातून सुमारे दोन लाख लोकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीही जवळपास तेवढेच लोक हजला गेले होते. दुसरीकडे अनेक यात्रेकरू बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या यात्रेकरुंना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. बेपत्ता हज यात्रेकरूंचे नातेवाईक रुग्णालयात त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत.

हज अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसातील सर्वात उष्ण तासांमध्ये सूर्यप्रकाश टाळण्याची सूचना केली आहे. सौदी लष्कराने यात्रेकरूंच्या मदतीसाठी १६०० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. त्याचबरोबर ३० जलद कृती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ५ हजारांहून अधिक स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.

उष्णता वाढण्याचे कारण काय?

या भागातील तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आलं आहे. सौदी नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजीच्या म्हणण्यानुसार, मक्काच्या आसपास उष्णता आणि दमछाक करणारे उष्ण हवामान अनुभवले जात आहे. मक्का सौदी अरेबियाच्या दक्षिणेला आहे.त्यामुळे उत्तर व मध्य भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून हे ठिकाण वंचित आहे. मक्केच्या हवामानावरही लाल समुद्राचा प्रभाव दिसून येतो. संध्याकाळच्या वेळी, समुद्राची वारे किनारपट्टी आणि आजूबाजूच्या भागात गरम करतात. त्याचा परिणाम या भागातही दिसून येत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम