सहावी ते आठवीसाठी 10 दिवस दप्तराविना शाळा; विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय स्तरावरच व्यवसाय शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे राज्याने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यातही सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी ‘दहा दिवस दप्तराविना शाळा’ या उपक्रमाचे आयोजन शाळेत करण्याची शिफारस मसुद्यात केली आहे. या दहा दिवसांत विद्यार्थ्यांना सुतारकाम, इलेक्ट्रिक काम, धातूकाम, बागकाम, पुंभारकाम व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हिंदुस्थानी ज्ञान प्रणालीअंतर्गत राज्याची संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरू-शिष्य परंपरा या घटकांची ओळख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना करू देण्याची सूचना मसुद्यात केली आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी ‘प्राचीन ज्ञानवारसा जपूया-पाठांतर स्पर्धेचे आयोजन करूया’ यानुसार तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यास सुचविले आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. देशातील प्राचीन ऋषींची दीनचर्या, आहार, ग्रंथसंपदा, जीवनविषयक दृष्टिकोन, ग्रंथसंपदा यांची ओळख तसेच थोर पुरुष, समाजसुधारक, सण व उत्सव, देशाविषयी अभिमान रुजविणे, तंत्रज्ञानाची माहिती, गड किल्ले माहिती विद्यार्थ्यांना देण्याची शिफारस आहे.

विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक, भगवद्गीतेची ओळख

राज्य अभ्यासक्रम आराख्डय़ाच्या मसुद्यात हिंदुस्थानी ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आला असून तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा तर नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीतेतीलद्बारावा अध्याय पाठ करण्याची स्पर्धा घेण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच हिंदुस्थानी मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यास सुचविले आहे.

विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा अधिकार

विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश रद्द करण्याची तरतूद मसुद्यात केली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास शाळेतील प्रवेश रद्द करणे, शाळेतून कायमची हकालपट्टी करणे किंवा कायमचा प्रवेश रद्द करणे असे टोकाचे निर्णय सुचवण्यात आले आहेत; मात्र त्यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांप्रति दयाळूपणा, क्षमाभावना असावी, असेही म्हटले आहे.

मसुद्यात सहावीपासून पुढे मराठी भाषेची सक्ती केलेली दिसत नाही. अकरावी-बारावीच्या गटात इंग्रजी विषय अनिवार्य नसला तरी कोणत्याही दोन भाषा निवडण्याची सूट विद्यार्थ्यांना आहे. यात मराठीची सक्ती केली आहे, असे स्पष्ट होत नाही.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील