जळगाव शहरात पुन्हा खळबळ, चॉपरने वार करून तरुणाचा खून

जळगाव – जळगाव शहर बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता पुन्हा एकदा खुनाच्या खळबळजनक घटनेने हादरले आहे. एका ३६ वर्षीय तरुणाचा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला असताना १० ते १२ अज्ञात मारेकऱ्यांनी येऊन चॉपरने ७ ते ८ वार करून त्याचा निर्घूण खून केला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

किशोर अशोक सोनवणे (कोळी, वय ३६, रा. कोळी पेठ, बालाजी मंदिराच्या मागे, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. किशोर कोळी हा गुरुवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता त्याचा मित्र अमोल सोनार उर्फ गंपू व इतर तीन चार मित्रान सोबत कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता. तेथे जेवण करीत असताना अज्ञात १० ते १२ चार इसम आले आणि त्यांनी किशोर कोळी यांच्याशी पूर्व वैमनस्यातून वाद घातला. त्यानंतर यातील तीन ते चार जणांनी किशोर कोळी याच्यावर चॉपरने सात ते आठ वार करून त्याचा निर्घुण खून केला.

यावेळी हॉटेलमध्ये पळापळ झाली. मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमोल उर्फ गंपू सोनार याला शनिपेठ पोलीस स्टेशनला नेले असून पुढील माहिती त्याच्या जवळून घेत आहेत. दरम्यान पाच ते सहा महिन्यांपूर्वी मयत आणि मारेकरी यांच्यामध्ये काही वाद झाले होते व त्या वादातूनच हा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. मयत किशोर सोनवणे (कोळी) यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे देण्यात आला आहे. याठिकाणी नातेवाईक एकच आक्रोश करीत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.