जळगावातील दरोडा प्रकरणात तीन भावांना अटक

जळगाव – सोमवारी जळगाव शहरातील सराफा बाजारातील सौरभ ज्वेलर्स नावाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत ६ दरोडेखोरांनी ३२ लाखांचे दागिने आणि रोकड चोरू नेल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती . पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत एकाला पुण्यातून तर दोघांना जळगावातून ताब्यात घेण्यात आले होते . विशेष म्हणजे हे तीन संशयित सखे भाऊ निघाले असून त्यांचे तीन अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे . दरम्यान तिघांना २१ रोजी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भवानी पेठ येथे सौरभ कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये मागच्या बाजूने दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकीत सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होते. येथील दोन कर्मचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविण्यात आला होता. दरोडेखोर दरोडा यशस्वी करून पसार झाले होते. दरम्यान, ज्वेलर्सच्या दुकानातील मागील बाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सहा जण दिसून येत होते. त्या आधारे शनीपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्त विद्यमाने तपास केला.

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर जवळ असलेल्या राजीव गांधी नगर येथील तीन सख्खे भाऊ रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२), सागरसिंग जीवनसिंग जुन्नी (वय २५), झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (वय २२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे. यातील रणजीतसिंग याला पुण्यातून तर दोघांना जळगावतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मंगळवारी दि. २१ मे रोजी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता तेथे तिघांना दि. २७ मे पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एलसीबीचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम, शनिपेठचे प्रभारी निरीक्षक विठ्ठल पाटील, तपास अधिकारी पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या दरोड्यामध्ये चार संशयित आरोपी जळगावचे तर दोन बाहेर जिल्ह्यातील असल्याचे समजून येत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.