‘जेल का जवाब व्होट से’ म्हणायला घातली बंदी, आपच्या प्रचार गीतावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

‘जेल के जबाब में हम व्होट देंगे…’ म्हणण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. आपच्या प्रचार गीतातील ही ओळ बदलण्याचे फर्मान आयोगाने काढले आहे. आवश्यक त्या सुधारणा केल्यावर हे प्रचार गीत पुन्हा प्रमाणपत्रासाठी सादर करावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

या गाण्यातील घोषवाक्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा वारंवार येणारा उल्लेख एक प्रकारे न्यायव्यवस्थेवर आक्षेप घेतो. यामुळे आयोगाच्या निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे आणि जाहिरात संहितेचे उल्लंघन होत आहे, असा तर्क निवडणूक आयोगाने प्रचार गीतावर आक्षेप घेताना काढला आहे.

मार्चमध्ये केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. ‘आप’ने असा दावा केला आहे की, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले कारण भाजपने सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करावा अशी त्यांची इच्छा नव्हती. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.

ईडी, सीबीआयने कारवाई केलेले इतर राजकीय नेते भाजपमध्ये सामील होताच त्यांच्यावरील खटले बंद केले जातात तेव्हा आयोग त्याला आक्षेप घेत नाही, परंतु जेव्हा आम्ही आमच्या प्रचार गीतात याचा उल्लेख करतो तेव्हा आयोग त्याला आक्षेप घेतो. याचा अर्थ भाजपचे हे हुकूमशाही सरकार आहे, असे आयोगालाही वाटते, असे अतिशी म्हणाल्या.

प्रचार गीताला आक्षेप का?

अरविंद केजरीवाल यांचे पह्टो, पोस्टर हातात धरून, ‘जेल के जवाब में हम वोट देंगे’ हे वाक्य वारंवार म्हणणारा एक आक्रमक जमाव या गीताच्या व्हीडीओत दिसतो. केजरीवाल यांना या व्हीडीओत गजाआड दाखवले आहे. असे चित्रण आणि वाक्य म्हणजे न्यायव्यवस्थेवर आक्षेप होतो, असे आयोगाने म्हटले आहे.

हे भाजपचे षडयंत्र

निवडणूक आयोगाने आपच्या प्रचार गीतावर बंदी घातल्याचा दावा आप नेते आतिशी यांनी केला. निवडणूक आयोगाची कारवाई हे भाजपने उगारलेले आणखी एक राजकीय हत्यार असल्याचे त्या म्हणाल्या. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाच्या प्रचार गीतावर बंदी घातली आहे, असा दावा त्यांनी केला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला