PM मोदी, राहुल गांधींनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप; ECI ने बजावली नोटीस

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांचा धुरळा उडतोय. निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणूक रंगत असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस बजावली आहे.

धर्म, जात, समाज आणि भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट पाडण्याचे आरोप भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर करत आहेत. या जातीय वक्तव्यांप्रकरणी आता भाजप आणि काँग्रेसला केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांना या प्रकरणी 29 एप्रिल सकाळी 11 पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 77 नुसार दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी उत्तर सादर करावं, असं आयोगाने म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची खासकरून स्टार प्रचारकांच्या वर्तनाची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. उच्चपदस्थ नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

काँग्रेसने दिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाच्या नोटीसवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही निवडणूक आयोगात तक्रार केली होती. भाजप प्रचारात धर्माचा आधार घेत दुरुपयोग करत आहे. हे चिंताजनक आहे. यामुळे आम्ही या नोटीसला उत्तर देऊ, असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने