‘त्या’ चार मसाल्यांवरील बंदीनंतर भारताचा मोठा निर्णय, हाँगकाँग, सिंगापूरकडे केली मोठी मागणी!

मुंबई – मसालेनिर्मिती करणाऱ्या भारतातील दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी  घालण्यात आली. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईड  या किटकनाशकाचे प्रमाण अधिक आहे.

या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका आहे, असे कारण या देशांनी दिले आहे. दरम्यान या दोन्ही देशांच्या निर्णयाची भारत सरकारने दखल घेतली आहे. भारत सरकारने या दोन्ही देशांना घेतलेल्या निर्णयाबाबत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली, त्या कंपन्यांनाही सविस्तर माहिती विचारली आहे.

भारत सरकारने काय निर्णय घेतला?

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन्ही देशांना बंदी घालण्यात आलेल्या मसाल्यांबाबत एक विस्तृत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्या कंपन्यांनाही आपले सविस्तर मत मांडण्याचा आदेश दिला आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयातील एखा अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगने जो निर्णय घेतला आहे, त्याचा विश्लेषणात्मक रिपोर्ट तसेच ज्या निर्यातदारांचे मसाले नाकारण्यात आले, त्यांचीही माहिती मागवण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या दूतावासांना तशी विनंती करण्यात आली आहे. सिंगापूरच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी आणि खाद्य आणि पर्यावरण स्वच्छता विभागालाही याबाबतचे रिपोर्ट देण्याची विनंती करण्यात आली आहे.

एकूण चार मसाल्यांवर घालण्यात आली बंदी

भारतातील मसाला निर्मिती करणाऱ्या दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांच्या विक्रीवर सिंगापूर आणि हाँगकाँगवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले होते. बंदी घालण्यात आलेल्या मसाल्यांमध्ये मद्रास करी पावडर, मिश्रित मसाला पावडर, सांबर मसाला तसेच फिश करी मसाला यांचा समावेश आहे.

अभ्यास केल्यानंतरच काय ते समोर येणार

दरम्यान, हाँगकाँग आणि सिंगापूरच्या या निर्णयामुळे भारतात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये ईथिलीन ऑक्साईड यासारखे कर्करोगास कारणीभूत ठरणारे, घटक असू शकतात का? असे विचारले जात आहे. याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. भारत सरकारने मागवलेल्या विस्तृत रिपोर्टचा अभ्यास केला जाईल. त्यावर संशोधन केले जाईल. त्यानंतरच काय ते समोर येईल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम