ईलेक्ट्रीक शॉक लागल्याने तरूणाचा करूण अंत, दुसरा गंभीर जखमी; परिसरात हळहळ

जळगाव – एमआयडीसीतील एका प्लॉस्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

घरातील कर्तापुरूष गेल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल दरबार राठोड (वय-२२) रा. शेलगाव ता.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी रा. बेदावद ता. जामनेर असे जखमी झालेल्या दुसऱ्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, राहूल दरबार राठोड हा तरूण गेल्या २० वर्षांपासून आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी कंपनीत काम करत असलेल्या मशिननचा ईलक्ट्रीक शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला जीवन गजानन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले. तर जखमीस खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मयत राहूल राठोड हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर आजपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताच्या पश्चात आई कौसल, वडील दरबार भिका राठाडे, लहान भाऊ अर्जून आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या