सलग ३३ वर्ष पंढरीची पायीवारी करणारे साकळीचे विठ्ठलभक्त सुपडू तेली

साकळी ता.यावल -सलग ३३ वर्ष पंढरपुरची पायीवारी करणारे साकळीचे विठ्ठलभक्त सुपडू दामू तेली यंदाच्या ३४ व्या पायीवारीत सहभागी झालेले असून तब्बल महिनाभरानंतर आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाने यंदाच्या आपल्या पायीवारीची सांगता करणार आहे. सुपडू तेली यांच्या प्रमाणेच आणखी गावातील अनेक महिला-पुरुष वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी अनेक पायीवारी दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात.वयाच्या साठीपारही पायीवारी करत सुपडू तेली यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेले आहे.
सर्व तिर्थांचे माहेर असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यां प्रमाणे साकळी ता.यावल येथील भवानी पेठेतील रहिवाशी विठ्ठलभक्त सुपडू दामू तेली हे सलग ३३ वर्षांपासून पायीवारी करत आहे. जळगाव येथील ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या वतीने आयोजित पायीदिडींत सुपडू तेली हे सन
१९८८ पासून सहभागी होत आहे.या दिडींत चोपदाराची महत्वाची जबाबदारी सांभाळत पायीवारीला जात असतात. कोरोना काळातील चुकलेली वारी वगळता सलग ३३ पायीवाऱ्या पूर्ण करून ३४ व्या वारीत पांडुरंगाच्या नामस्मरणाने ते मार्गक्रमण करीत आहे. सुपडू तेली यांच्या परिवारात पत्नी,दोन मुले,तीन मुली, सुना, जावाई,नातवंडे असा परिवार असून श्री तेली यांचे वय जवळपास ६५ पार केलेले आहे. तरी त्यांच्या विठ्ठल भक्तीत काहीही कमतरता नाही. तेली यांच्या मुखी सदासर्वदा ‘ हरी – हरी ‘ शब्द येत असल्याने त्यांना गावात सर्वत्र ‘हरी-हरी ‘ या नावानेच ओळखतात.हे विशेष आहे.गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.
पंढरपूरचे पांडुरंग माझे सर्वस्व आहे. देवाच्या दर्शनाने मला जिवनाचा परमानंद मिळत असतो.दर वर्षाच्या पायीवारीने मला एक वेगळा आनंद व ऊर्जा मिळत असते.एकूणच माझे जीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित आहे.पायीवारीत सहभागी होण्यासाठी पांडुरंगच मला शक्ती देत असतो. असे सुपडू तेली यांनी जळगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या पायीवारीतूनच सांगितले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या