साकळीसह परिसराला जोरदार वादळाचा तडाखा ;अनेक घरांवरची पत्रे उडाली, केळीबागा जमिनदोस्त 

साकळी ता.यावल (वार्ताहर) आज दि.४ रोजी दुपारच्या वेळी झालेल्या जोरदार वादळामुळे साकळीसह परिसरातील गावांना वादळाचा मोठा तडाखा बसलेला असून जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार वारा व वादळाने भयानक थैमान घातले होते.या वादळामुळे साकळीसह परिसरातील अनेक हेक्टर शेतामधील केळीबागा

 

जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.वादळाचा वेग एवढा मोठा होता की,मोठ-मोठी झाडे अक्षरशः गिरक्या घेत होती.या वादळामुळे शेतकरी धास्तावला आहे.वादळानंतर परिसरात हलक्या पावसाच्या सरी आल्या.

या बाबत सविस्तर असे की,आज दि.४ रोजी अकरा वाजेपर्यंत चांगलेच उन्ह तापत होते.त्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला व दुपारी सुमारे पाऊणेबारा वाजेपासून जोरदार वादळीवारा सुटला. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे मुळे धुळीचे लोट आकाशात उडू लागले होते. त्यानंतर काही क्षणातच वाऱ्याचा वेग वाढून वादळास सुरुवात झाली.जवळपास अर्धा ते पाऊण तास चाललेल्या वादळाने साकळी, शिरसाड,मनवेल,

थोरगव्हण, शिरागड, पिळोदा,नावरे,चुंचाळे,बोराळे सह परिसरातील गावांना मोठा तडाखा दिलेला आहे. या अचानक झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरची तसेच गुराढोरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाली तर साकळी येथे मुजूमदार कॉलनीत एका घरावर झाडाची फांदी पडली मात्र घरातील व्यक्ती शेतात गेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला तर भवानी पेठ भागातील प्रकाश सोनार यांच्या घरावर झाडांची मोठी फांदी पडली.तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली व झाडाच्या फांद्याही तुटून पडल्या. वादळामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या व अनेक ठिकाणी मुख्य विजवाहीनीला हानी झाल्यामुळे बराच वेळ वीज गेलेली होती.वादळाचा सर्वात मोठा फटका केळी बागांना बसला आहे.साकळीसह परिसरातील अनेक गावांतील शेतांमधील केळीबाग उन्मळून जमीनदोस्त झाल्या. तर काही भागात तर केळी बागांचे मळेच्या-मळे अगदी संपुर्ण उध्वस्त झालेले असून कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. वादळाची एवढी भयानक स्थिती होती की,शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांना व मजुरांना चालतांना रस्ता दिसत नव्हता.आज रविवार रोजी साकळी येथील आठवडे बाजार वादळामुळे बाजातील लोकांची एकच तारांबळ उडाली होती. साकळीसह संपूर्ण परिसरातील नुकसानग्रस्त केळीच्या बागांचे संबंधित प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार,खासदार या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी