राज्य सरकारचा निर्णय! माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे घेत निलंबन रद्द

महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतल्याचं वृत्त आहे. इतकंच नाही तर डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेला निलंबन आदेशही मागे घेण्यात आला असून निलंबनाचा कालावधी ‘ऑन ड्युटी’ असल्याचं मानलं जावं, असं देखील आदेशात म्हटल्याचं सांगण्यात येत आहे.

यावृत्तानंतर आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. आता परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh