सलग ३३ वर्ष पंढरीची पायीवारी करणारे साकळीचे विठ्ठलभक्त सुपडू तेली

साकळी ता.यावल -सलग ३३ वर्ष पंढरपुरची पायीवारी करणारे साकळीचे विठ्ठलभक्त सुपडू दामू तेली यंदाच्या ३४ व्या पायीवारीत सहभागी झालेले असून तब्बल महिनाभरानंतर आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाने यंदाच्या आपल्या पायीवारीची सांगता करणार आहे. सुपडू तेली यांच्या प्रमाणेच आणखी गावातील अनेक महिला-पुरुष वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी अनेक पायीवारी दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात.वयाच्या साठीपारही पायीवारी करत सुपडू तेली यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेले आहे.
सर्व तिर्थांचे माहेर असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यां प्रमाणे साकळी ता.यावल येथील भवानी पेठेतील रहिवाशी विठ्ठलभक्त सुपडू दामू तेली हे सलग ३३ वर्षांपासून पायीवारी करत आहे. जळगाव येथील ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या वतीने आयोजित पायीदिडींत सुपडू तेली हे सन
१९८८ पासून सहभागी होत आहे.या दिडींत चोपदाराची महत्वाची जबाबदारी सांभाळत पायीवारीला जात असतात. कोरोना काळातील चुकलेली वारी वगळता सलग ३३ पायीवाऱ्या पूर्ण करून ३४ व्या वारीत पांडुरंगाच्या नामस्मरणाने ते मार्गक्रमण करीत आहे. सुपडू तेली यांच्या परिवारात पत्नी,दोन मुले,तीन मुली, सुना, जावाई,नातवंडे असा परिवार असून श्री तेली यांचे वय जवळपास ६५ पार केलेले आहे. तरी त्यांच्या विठ्ठल भक्तीत काहीही कमतरता नाही. तेली यांच्या मुखी सदासर्वदा ‘ हरी – हरी ‘ शब्द येत असल्याने त्यांना गावात सर्वत्र ‘हरी-हरी ‘ या नावानेच ओळखतात.हे विशेष आहे.गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.
पंढरपूरचे पांडुरंग माझे सर्वस्व आहे. देवाच्या दर्शनाने मला जिवनाचा परमानंद मिळत असतो.दर वर्षाच्या पायीवारीने मला एक वेगळा आनंद व ऊर्जा मिळत असते.एकूणच माझे जीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित आहे.पायीवारीत सहभागी होण्यासाठी पांडुरंगच मला शक्ती देत असतो. असे सुपडू तेली यांनी जळगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या पायीवारीतूनच सांगितले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला