सगळीकडेच वाहतुकीचे नियम खूप कडक करण्यात आले आहेत. नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र इथे तर अजबच प्रकार आहे.
हेल्मेट घालून आणि नियम पाळूनही तुमचं 2000 रुपये चलन कापलं जातं. नेमकं कुठे आणि यामागचं काय कारण आहे समजून घेऊया.
तुम्ही जर कार किंवा बाईक घेऊन बाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. तुम्हालाही भरावा लागू शकतो 2000 रुपयांचा दंड
वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस आणि अधिकारी अनेक नवीन नियम आणत आहेत. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन वाहतूक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे.
नुसतं डोक्यावर हेल्मेट घातलं मात्र ते व्यवस्थित लॉक केलं नसेल तर कलम 194D MVA नुसार 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
BIS नोंदणीकृत हेल्मेट असणं आवश्यक आहे. ते नसेल तरी तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. एकूण हा दंड 2000 रुपये असू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.
रस्ते वाहतूक विभागाने नुकतेच लहान मुलांना घेऊन जाताना पाळावे लागणाऱ्या अनेक सुरक्षेचे नियम आणले आहेत. प्रौढांनी हेल्मेट घालावे, तर मुलांनीही बेल्ट घालावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बाईकचा वेग हा 40 किमी पेक्षा जास्त असेल तरी 1000 रुपये दंड भरावा लागेल अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो.