13 वर्षीय मुलाचं अपहरण! 5 कोटींची मागणी अन् फडणवीसांनी घेतली दखल, अखेर काय घडलं?

जालना – जालना येथून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात कृष्णा मूजमुले पाटील यांचा 13 वर्षीय मुलगा श्रीहरी कृष्णा मूजमुले याचं अपहरण झालं. शाळेत जाताना सकाळी 8 च्या सुमारास रस्त्यातून त्याचं अपहरण करण्यात आलं.

अपहरण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी मुलाच्या वडिलांना अपहरणकर्त्यांचा फोन आला. मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी 5 कोटीची खंडणी मागितली.

कोणतीही वेळ न गमावता मुलाच्या वडिलांनी सदर हकीकत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांना फोनवर कळवली. ओमप्रकाश शेटे यांनी सदर बाब राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीसदेखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांची पथकं तयार करण्यात आली. घटनेला 2 तास झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज खंगाळत पोलिसांना अपहरणकर्त्याचे आयडेंटीफिकेशन करण्यास यश मिळाले. अपहरण झाल्यानंतर 5 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू, अशी धमकी अपहरणकर्ते देऊ लागले.

 

छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलांने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, असं त्यांनी सांगितलं. पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचं ठरलं. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.

10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशांची व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना रात्री साडेआठ वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी येण्यास सांगितलं. पोलिसांनी रचलेल्या सापळ्याप्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले. त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्याआधीच पोलिसांनी झडप घातली. अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील